गुरुवार, २१ मार्च, २०१३

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात


या वर्षी संपूर्ण भारतभर दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.सध्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.पूर्वी मराठवाडा आणि विदर्भातच दुष्काळ पडत असे.परंतु या वर्षी पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसलेला आहे.सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मराठवाड्याचा टॅकरवाडा झालेला दिसून येतो.तर विदर्भात अजूनच भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे.

महाराष्टाच्या तुलनेत गुजरातमध्ये याउलट परिस्थिती आहे.येथे पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विकास होताना दिसत आहे.मागील १० वर्षात गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करता गुजरात सगळ्याच बाबतींत महाराष्ट्राच्या पुढे आहे.येथे रस्ता,वीज,पाणी आणि आरोग्य या पायाभूत सुविधा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचलेले आहेत.

गुजरात राज्याने पुढील योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या 

साबरमती नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून प्रश्न सोडवला
कॅनोलवर सौरउर्जा निर्माण करण्यात आली आहेत.याचा परीनाम म्हणजे पाणी बाष्पीभवन थांबण्यास मदत होते.














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा