गुरुवार, २१ मार्च, २०१३

शहर आणि पाणी बचत





शहरात सध्या एकच वेळी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला .काहीना याचा आनंद झाला तर काहीना मात्र दुख, शहरातील काही परिसरात एक वेळही पाणीपुरवठा होत नाही .कमी दाबामुळे काहीना पाणी मिळत नाही. या कमी दाबामुळे नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे. याचा सर्वंकष विचार करून शहराच्या पाणीपुरवठय़ामधील वेळापत्रकात बदल करून फक्त मंगळवारी पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गंगापूर धरणातील शहराला 15 जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी सध्या स्थिती असतांना पाऊस लांबल्यास तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.याचा विचार मनपा प्रशासनाने करण्याची गरज आहे. पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्याने त्यानंतरच्या काही दिवस बहुतांशी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

शहरातील लोक मात्र प्रशासनाच्या नावाने व प्रशासन लोकांना दोषी ठरवितातच धन्यता मानत आहे. परंतू वास्तवात मात्र एकमेकाना दोष देतच दिवस ढकलले जातत. पाणी बचत हे सर्वाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी पुढकार घ्यायला हवा. जर जर आपण पाणी बचत करु शकत नसू तर आपणाला पाणी नासविण्याचाही आधीकार नाही. त्यामुळेच पाणी बचत म्हणजेच पाणी निर्मिती,जर आपन पाणी निर्माण करु शकत नाही तर आपण पाणी बचत करून पाणी निर्माण केले असे समजावे.

शहरातील विविध ठिकाणी गरज नसताना अनेक ठिकाणी पाणी नासविण्याची चित्रे पहावयास मिळतात जर अशीच परिस्थती सर्व ठिकाणी दिसत असेल तर मात्र प्रशासनाल कडक कायदा पाण्यासाठी करावा लागेल जसे काही दिवसापूर्वी निफाड येथे शेतकर्याना अटक करावी लागली.पाण्यावरून अटक झाल्यची हि पहिलीच घटना असवी. अशी परीस्थिती कुणावरही येवू नये यासाठी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.



एकीकडे पाणी बचत करण्यास मनपा प्रशासन सांगत आहे तर दुसरीकडे मात्र शहरातील कॉलेजरोड वरील दुभाजक धुण्याचे  काम करताना कामगार 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा